Ashadhi Wari | माऊलींच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांचे सरकारला तीन प्रस्ताव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी यात्रा होणार का हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. याबाबत माऊलीच्या पालखी सोहळ्याबाबत विश्वस्तांनी शासनाला आता तीन नवे प्रस्ताव दिले आहेत. तसेच 2020 च्या वारीचे स्वरुप कसे असावे याबाबतचा आराखडा देखील शासनाला दिला आहे. काल यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय मानाच्या पालखी आयोजकांनी घेतला होता. आषाढी वारीसाठी राज्यातील सात मानाच्या पालखी सोहळ्यांपैकी एकनाथ महाराज पैठण, निवृत्तीनाथ महाराज त्रम्बकेश्वर, मुक्ताबाई, मुक्ताईनगर जळगाव आणि सोपान काका सासवड यांनी यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पायी सोहळा रद्द करण्याचा निर्णय काल घेतला आहे. आता विश्वस्तांनी तीन प्रस्ताव वारीबाबत दिले आहेत.