Irrigation Scam: 'तुमच्या सगळ्या केसेस बंद करण्यात आल्या', Anjali Damania यांचा Ajit Pawar यांच्यावर आरोप

Continues below advertisement
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मित्र झाल्यामुळेच अजित पवारांवरील घोटाळ्याच्या सर्व केसेस बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला आहे. या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, 'प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाइल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस बंद करण्यात आल्या. त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल?'. या टीकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात जुने घोटाळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, दमानिया यांनी हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola