Amruta Fadnavis: मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात- अमृता फडणवीस ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Feb 2022 03:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीसांप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता या ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही... मुंबईतल्या वाहतूककोंडीवरुन सरकारवर टीकास्त्र डागताना अमृता फडणवीसांनी एक धक्कादायक दावा केलाय. मुंबईतल्या ट्रॅफिक जामममुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय. भाजपनं आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा आज अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी मुंबईकरांच्या समस्येबद्दल बोलताना ट्रॅफिक जाम आणि घटस्फोटाचं नातं जोडलंय.