Amravati Teachers On Budget : अर्थसंल्पातून शिक्षकांना काय मिळणार? सरकारकडून अपेक्षा काय?

Continues below advertisement

Amravati Teachers On Budget : अर्थसंल्पातून शिक्षकांना काय मिळणार? सरकारकडून अपेक्षा काय?

हेही वाचा : 

 एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmers Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात 2024 मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंताजनक आहे.

 जानेवारी ते एप्रिल2024 या चार महिन्यांत राज्यात 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारीत झाल्या आहेत. फेब्रुवारीत 208, मार्चमध्ये 215 आणि एप्रिलमध्ये 180 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. याचा हिशेब लावायचा झाल्यास या चार महिन्यांत दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळल्याचे दिसत आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या गंभीर गोष्टीकडे राजकारण्यांसह सामान्य जनतेचेही दुर्लक्ष झाले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी

राज्यातील अमरावती विभागात सर्वाधिक 383 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, छत्रपती संभाजीनगर विभागात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात 84, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये झाल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram