Amravati Crop Loss | अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, गहू बाजरी मातीमोल
अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज पहाटे पावसानं जोरदार हजेरी लावली. शेतात उभा असलेला गहू, हरभरा, कापणीवर आलेला असताना पावसामुळे मातीमोल झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर, बाजारा, मोर्शी यासह इतर तालुक्यांना या पावासाचा फटका बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. परभणीतही सलग दोन दिवस झालेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं. गहू आणि हरभरा ही पीकं अक्षरश: झोपली आहेत.