Akola Pik Vima News : अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पीकविमा कंपनीकडून थट्टा

Continues below advertisement

अकोला जिल्ह्यातील म्हैसांग या गावातील रहिवासी असलेले शेतकरी आकाश पिपरे यांच्या बाबतीत देखील असाच काहीसा प्रकार घडला आहे. या आठवड्यात आकाश यांच्या खात्यात पीकाच्या नुकसान भरपाईची रक्कम जमा झालीय. आधीच दुबार पेरणीची चाहूल लागल्याने पिकविम्याच्या भरपाईकडे डोळे लावून बसलेल्या आकाशच्या पायाखालची जणू वाळूच सरकलीय. कारण, त्याच्या हाती आलेले रक्कम आहे फक्त 189 रूपये. त्याला 20 हजारांपर्यंत भरपाई मिळण्याची अपेक्षा होती. यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी आणि  गारपीटीनं त्याच्या रब्बीतील हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे त्याला एक शेवटची आस होती ती पिक विम्याच्या भरपाईतून फाटलेल्या संसाराला थिगळ लागण्याची. 

तर दुसरीकडे अशीच स्थिती झालीय मुर्तिजापूर तालूक्यातील राजूरा सरोदे गावातील शेतकरी रियाजुद्दीन सय्यद यांची. त्यांच्या माथीही विमा कंपनीने मारलेत फक्त 583 रूपये. त्याच्या दोन एकरातील हरभरा नुकसानीसाठी त्याला मिळायला हवे होते 23, 328 रूपये. मात्र इथे देखील पीकविमा कंपनीकडून मदत तर दूरच, मात्र उलट शेतकर्‍यांची थट्टाच केली जात असल्याचे चित्र आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram