Ashadhi Wari 2021 : वारीबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील : अजित पवार

मुंबई : आषाढी वारी सोहळ्याबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत वारकऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत वारकऱ्यांनी जास्तीत जास्त पाचशे आणि कमीतकमी शंभर व्यक्तींच्या उपस्थितीत पायी वारी सोहळा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. वारीमध्ये अनेक घटक सहभागी होत असतात. त्यामुळे वारीबद्दल आज निर्णय झालेला नाही. कॅबिनेटमधे यावर चर्चा होईल आणि मुख्यमंत्री याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय.

आषाढी वारी संदर्भात राज्य सरकारने  9 जूनपर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर करावा. वारीच्या मार्गात येणाऱ्या गावकऱ्यांशी देखील संपर्क करण्यात आला आहे. मात्र, सरकारचा निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांचे प्रतिनिधी भाऊसाहेब गंभीरे आणि अशोक सावंत यांनी दिला आहे. तर वारकऱ्यांनी मर्यादित लोकांमध्ये वारी पायी व्हावी अशी मागणी केली आहे. आजच्या बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना बुधवारपर्यंत सादर केला जाईल. बुधवार किंवा गुरुवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वारी संदर्भात निर्णय घेतील, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola