AI Education: 'तिसरीपासून मुलांना AI शिकवणार', शालेय शिक्षण सचिव Sanjay Kumar यांची घोषणा
Continues below advertisement
केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात तिसरीपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान शिकवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी ही माहिती दिली. 'पुढील दोन वर्षात तिसरीच्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट करायचा आहे, यासाठी युद्धपातळीवर तयारी करावी लागेल,' असे सचिव संजय कुमार यांनी सांगितले. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांमध्ये हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. यासाठी CBSE ने आयआयटी-मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमन (Prof. Karthik Raman) यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती अभ्यासक्रमाची रचना करणार असून, डिसेंबर २०२५ पर्यंत आवश्यक साहित्य तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement