Ahmednagar : टोमॅटो उत्पादकांना दिलासा द्या, किसान सभेचा राजकारण्यांना इशारा :ABP Majha

टोमॅटोला चांगला भाव मिळत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर भरुन टोमॅटो लासूर स्टेशन परिसरातील औरंगाबाद-मुंबई महामार्गावर ओतून आंदोलन केलं. तर तिकडे नाशकातील येवला बाजारसमितीच्या शेजारील मोकळ्या मैदानातही अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिला. टोमॅटोची मागणी कमी आणि आवक जास्त असल्यानं सध्या येवल्यातही भाव मिळत नाहीए. त्यामुळे शेळ्या, मेंढ्यासह जनावरांसाठी शेतकऱ्यानं टोमॅटो टाकून दिल्याचं पाहायला मिळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola