Aditya Thackeray | किती दिवस इतिहासात रमणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल | ABP Majha
दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. भारतरत्नं कोणाला द्यायचं हे भाजपच्या हातात आहे त्यांनी द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस राज्याचा विकास करण्यासाठी एकत्र आली आहे. दरम्यान, आजची अर्थव्यवस्था आणि जीडीपी पाहून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिले त्यांना अभिमान वाटेल की त्यांना लाज वाटेल हा विचार करणेचे गरजेचे आहे. सध्या इतिहासाकडून प्रेरणा घेणे गरजेच आहे. देशातील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.