केंद्रीय मंत्र्यांना ही भाषा शोभते? Ajay Mishra यांच्याकडून ABP Network च्या पत्रकाराला धक्काबुक्की
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप असणारे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा वादात अडकलेत. अजय मिश्रा यांनी एबीपी नेटवर्कच्या पत्रकाराला धमकावलं. इतकंच नाही पत्रकाराचा मोबाईल खेचून कॅमेरे बंद केले. अजय मिश्रा यांनी पत्रकाराला “डोकं फिरलं आहे का?,” असे शब्द वापरले. मंत्र्य़ाच्या अशा वागणुकीवर आणि त्यांच्या मस्तवाल वागणुकीवर आता राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.