
RBI | एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था हळूहळू सुधारतेय - शक्तिकांत दास
Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळं अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला काहीअंशी दिलासा देणारी बातमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच एप्रिल महिन्याच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्याबाबतची बैठक संपल्यानंतर ते बोलत होते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट हा 4 टक्केच राहणार आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 2020 मध्ये पहिल्या 6 महिन्यात आर्थिक घसरण झाली आहे, या काळात जगभरातील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला जबर फटका बसला आहे. दरम्यान, एप्रिलच्या तुलनेत आता आर्थिक व्यवस्था हळूहळू सुधारत आहे. कोरोना काळात जगभरात आयातीवर परिणाम झाला आहे. भारतात महागाईचा दर वाढताच राहिला आहे, असं ते म्हणाले.
यावेळी शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेट हा 4 टक्केच राहणार आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.3 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 2020 मध्ये पहिल्या 6 महिन्यात आर्थिक घसरण झाली आहे, या काळात जगभरातील उत्पादन तसेच सेवा क्षेत्राला जबर फटका बसला आहे. दरम्यान, एप्रिलच्या तुलनेत आता आर्थिक व्यवस्था हळूहळू सुधारत आहे. कोरोना काळात जगभरात आयातीवर परिणाम झाला आहे. भारतात महागाईचा दर वाढताच राहिला आहे, असं ते म्हणाले.
Continues below advertisement