Kolhapur Rain | पंचगंगेच्या पातळीत दीड फुटांनी वाढ, 23 गावातील नागरिक स्थलांतरीत

कोल्हापुरात देखील पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या 12 तासात पंचगंगेची पाणी पातळी केवळ दीड फुटांनी वाढली आहे. सध्याची पंचगंगेची पाणी पातळी 44 फूट 7 इंच इतकी आहे. राधानगरी धरणाचे रात्री आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. पाणीपातळी वाढण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. दरम्यान काल कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 23 गावांमधील 4413 नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola