Kolhapur News : धक्कादायक! मुंबईत्या मेठ्या रुगणालयाची घोडचूक; मृतदेहांची केली अदलाबदल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमरणानं केली सुटका, जगण्याचं छळले होते अशी सुरेश भटांची अजरामर कविता आहे. मात्र कोल्हापुरातली एक बातमी पाहून तुम्हाला वाटेल, जगण्याचं तर छळले होतेच, पण मरणानंतरही सुटका झालीच नाही. याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळी गावात राहणाऱ्या कृष्णात पाटील यांच्यावर मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला. हे दुःख कमी म्हणून की काय तर रुग्णालयाकडून जेव्हा हा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्याची वेळ आली, तेव्हा चुकून दुसराच मृतदेह सोपवण्यात आला. ही बाब लक्षात आली जेव्हा त्यांत्या मृतदेहावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार सुरू होते. त्यामुळे मृतदेह पुन्हा मुंबईला न्यावा लागला, आणि मग कृष्णात पाटील यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.