Aurangabad Janata Curfew | औरंगाबाद शहरात जनता कर्फ्यू वाढवणार नाही, मनपा आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
18 Jul 2020 06:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये जनता कर्फ्यू कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे वाढवला जाणार नाही. साडेचार ते पाच लाख लोक उद्योगावर अवलंबून आहेत. कर्फ्यू संपल्यानंतर कायमचे उपाय केले जाणार असल्याची माहिती दिली गेली.
उद्यापासून काम सुरू करायचंय, आता आपल्याकडे रॅपिड टेस्टिंग सुरू झाली आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे रॅपिड टेस्टींगही सुरू होईल आणि उद्यापासून ही टेस्टिंग होणार एक ते दीड आठवड्याच्या आत टेस्ट पूर्ण करणार असल्याचं सांगितलं गेलं. सोबतच याचा खर्च AMC आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देणार आहेत.