Ayodhya Verdict | सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस, 24 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार : उद्धव ठाकरे | ABP Majha
अखेर अयोध्येमधील बहुचर्चित वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने यासंदर्भात निर्णय देताना अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्याचा देखील निर्णय सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर देशभरातील प्रमुख नेतेमंडळी, साधू, मौलवींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील "आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस असल्याचे म्हटले आहे'