Sharad Pawar : राज्यपालांची तक्रार आणि संजय राऊतांवर ईडी कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर

नवी दिल्ली: गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. विधानपरिषदेच्या प्रलंबित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी लक्ष घालू असं आश्वासनही दिलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola