Sharad Pawar | भाजपला लागलेली उतरती कळा आता थांबू शकणार नाही : शरद पवार | ABP Majha
भाजपला उतरती कळा लागली आहे असं म्हणत शरद पवार यांनी झारखंडच्या जनतेचे शरद पवार यांनी आभार मानले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर योग्य वेळी लोक केंद्र सरकारला झारखंडसारखं उत्तर देतील असही म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. समाजात धार्मिक अंतर वाढवण्याचा प्रयत्न होत आहे असं म्हणत शरद पवार यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावरून टीका केली आहे. तसंच पंतप्रधान जे सांगतात आणि वस्तूस्थिती जी असते त्यात तफावत असते असंही ते म्हटले.