गोडसेनं जीनांची हत्या का केली नाही? फाळणी स्मृतीदिनावरुन संजय राऊत यांचा हल्लाबोल
पंतप्रधान मोदींनी १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी स्मृतीदिन म्हणून घोषित केला आहे... मात्र मोदी सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र डागताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.. पाकिस्तान निर्मितीसाठी फक्त महात्मा गांधींना जबाबदार ठरवून नथुराम गोडसेनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मात्र गोडसेनं गांधींऐवजी जीनांवर पिस्तुल रिकामं केलं असतं फाळणी स्मृृतीदिन घोषित करण्याची वेळच आली नसती. अशा परखड शब्दात सवाल विचारत राऊतांनी हल्लाबोल केलाय.