Sanjay Raut Meet Rahul Gandhi : देशातील लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उध्वस्त : संजय राऊत ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2021 07:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत विविध विषयांवर राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता होती. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.