Kashmir Violence: पंतप्रधान मोदी यांनी ठोस भूमिका घ्यावी, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

गेल्या काही दिवसांपासून काश्मिरमध्ये गैरकाश्मिरी नागरिकांच्या हत्येच्या झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सैन्य आणि पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीरमध्ये सध्या असलेल्या सर्व गैरकाश्मिरी नागरिकांना लष्कर आणि पोलिसांच्या कॅम्पमध्ये हलवण्यात येणार आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांकडून 2 गैरकाश्मिरींची हत्या करण्यात आली आहे. या मुद्यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola