Citizenship Amendment Bill | भाजपचा महत्वाकांक्षी संकल्प पूर्णत्वास | ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून बराच गदारोळ सुरू होता. विधेयक मंजूर झाल्यास बांगलादेशातून आलेल्या स्थलांतरित हिंदूंची संख्या वाढेल आणि स्थानिकांची संख्या कमी होईल, अशी भीती ईशान्येकडील नागरिकांनी व्यक्त करण्यात आली. विधेयकाला राज्यसभेत मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या मुस्लिमेतर स्थलांतरितांना भारताच्या नागरिकत्वाचा अधिकार प्राप्त होणार आहे. त्यामुळे स्थानिकांचे हक्क हिरावून घेतले जाणार असल्याचं सांगत काँग्रेससह अनेक पक्षांनी विधेयकाला विरोध दर्शवला होता.