Rahul Gandhi : केंद्राकडं शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा नाही, राहुल गांधी सरकारला फटकारलं
abp majha web team
Updated at:
03 Dec 2021 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्राकडं शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा नाही, मग पंतप्रधान माफी कोणाची मागतात असा प्रश्न विचारत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर सणकून टीका केली. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूंबाबत असंवेदनशील आहे. सरकारकडे मृत शेतकऱ्यांची माहिती नसली तरी काँग्रेसकडे मृत पावलेल्या 503 शेतकऱ्यांची यादी आहे. केंद्र सरकारनं आमच्याकडून ती यादी घ्यावी असंही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सुनावलं. पंजाब सरकारनं 403 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये दिले आणि 152 जणांना नोकरी दिल्याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.