Rahul Gandhi : कृषी कायद्यांविरोधात आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांवरुन राहुल गांधी आक्रमक
abp majha web team
Updated at:
07 Dec 2021 03:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिकडे केंद्रीय कृषी कायदे रद्द कऱण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातील मृत शेतकऱ्यांवरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आज आक्रमक पाहायला मिळाले. लोकसभेत पुन्हा एकदा राहुल गांधींनी मृत शेतकऱ्यांची यादी सादर केली. आणि सरकारनं त्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक पाठबळ आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याची मागणी केली. पंजाब सरकारनं ४०० शेतकऱ्यांना जशी मदत केली तशी मदत हरियाणा सरकारनंही केली पाहिजे असं मत राहुल गांधींनी सभागृहासमोर मांडलं. पण त्यावर सरकारकडून उत्तर मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं लोकसभेत थेट सभात्यागच केला.