‘गोष्ट गलवानची’ : गलवान घटेनेच्या एका वर्षानंतर कसं आहे लडाख? गलवानच्या भूमितून 'एबीपी माझा'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2021 11:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापतीला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मागील वर्षी 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली होती.
या झडपेत भारताचे 20 सैनिक शहीद झाले होते, तर चीनने केवळ चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचं कबूल केलं होतं. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर सध्या सीमेवर शांतता आहे आणि सैनिक मागे घेण्याचं काम सुरु आहे. पण विश्वासाचं वातावरण बनू शकलेलं नाही. कारण चीनने जेवढी आश्वासनं दिली त्याच्याविरोधात जाऊन कारवाई केली आहे.