Corona : सर्दी, डोकेदुखी आणि घशात खवखव असेल तरी कोरोनाची चाचणी करून घेण्याचं केंद्र सरकारनं आवाहन
कोरोनाचं संकट वाढल्यानं चिंता वाढलीय आणि नागरिकांनी आता हे संकट गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारनंही तसा इशारा राज्य सरकारांना दिलाय. अगदी सर्दी, डोकेदुखी आणि घशात खवखव असेल तरी कोरोनाची चाचणी करून घ्या, अशा सूचना केंद्र सरकारनं केल्यात. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांनी पत्र लिहून राज्यांना सतर्क केलंय. आरटीपीसीआर चाचण्यांना उशीर होऊ शकतो, त्यामुळे रॅपिड अँटिजेन टेस्ट करा, असंही त्यांनी सूचवलं आहे.