UPSC Student | UPSC विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी दिल्लीत लगबग, लॉकडाऊनमध्ये धावणार एकमेव स्पेशल ट्रेन

कोरोना लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी धावणारी एकमेव स्पेशल ट्रेनची तयारी आता पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सरकारच या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च उचलणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरात जवळपास १४०० विद्यार्थ्यांना घेऊन ही ट्रेन १६ मे रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या स्पेशल ट्रेनच्या प्रवासासाठीची लगबग सुरु झाली असून जवळपास ५० दिवस अडकलेले विद्यार्थी आता घरी जाणार या भावनेने सुखावले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola