Kerla Flood : आणि काही सेकेंदात घर वाहून गेलं ABP Majha

Kerala Heavy Rain: केरळमध्ये पावसाने हाहाकार माजला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक लोकं बेपत्ता आहेत. कोट्टायममध्ये पावसाचा सर्वात जास्त परिणाम दिसून येत आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, अल्लाप्पुझा जिल्ह्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, पावसामुळे, पठाणमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola