India On Canada : खासगीत झालेली चर्चा सर्वोत्तम परराष्ट्रमंत्र्यांचं वक्तव्य, कॅनडाला उपरती
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 02:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॅनडाच्या ४० राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सरकारनं देश सोडण्याचे आदेश दिल्यावर कॅनडाला आता उपरती होऊ लागली आहे. आम्ही भारताशी खासगीत चर्चा करत आहोत, खासगीत झालेली चर्चा सर्वोत्तम असते असं कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलोनी जॉली यांनी म्हटलंय. खरंतर, हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचा मुद्दा कॅनडानं चव्हाट्यावर आणल्यामुळेच दोन्ही देशांमध्ये वाद सुरू झाला. मात्र भारतानं सडेतोड उत्तर दिल्यामुळे कॅनडा चपापला, आणि आता तो देश खासगीच चर्चा करण्याची भाषा करू लागला आहे.