Assam : अतिक्रमण हटवा मोहिमेदरम्यान दोघांचा मृत्यू, 9 पोलीस कर्मचारी जखमी : ABP Majha

Continues below advertisement

गुवाहाटी : ईशान्य भारतात पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यातील ढोलपूर या ठिकाणी पोलिसांनी सुरु केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईला आता हिंसाचाराचे गालबोट लागलं असून त्यामध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेत नऊ पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याचं वृत्त आहे. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. (Violence broke out in Darrang during an anti-encroachment drive). 

दरांग जिल्ह्यातील ढोलपूर या ठिकाणी जवळपास 1,487 एकर परिसरात 800 कुटुंबांनी अवैध्यरित्या कब्जा मिळवून त्या ठिकाणी रहायला सुरु केल्याचं प्रशासनानं सांगितलं होतं. त्यामुळे या जमीनीवरील अतिक्रमण हटवून ती जमीन पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यावेळी तिथले रहिवासी आणि पोलीस आमने-सामने आले हिंसाचाराची घटना घडली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram