Ajit Navale : तेलंगणामध्ये कर्जमाफी, शेतकरी नेते अजित नवले यांचं मत काय?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Navale : तेलंगणामध्ये कर्जमाफी, शेतकरी नेते अजित नवले यांचं मत काय? तेलंगणा सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी केलीय... राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दोन वेळा शेतक-यांची कर्जमाफी करण्यात आली... मात्र अटी शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले... नियमित कर्ज भरणारे शेतकरी देखील प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित आहेत... लोकसभा निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटले... आता पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकरी कर्जमाफी करणार अशी चर्चा सुरू आहे... मागिल दोन कर्जमाफीच्या वेळी झालेला घोळ पाहता अगोदरच्या कर्जमाफीत पात्र शेतक-यांचा आणि नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांचा प्राधान्याने विचार करावा... जे अपात्र ठरले त्या त्रूटी दूर कराव्यात.... कर्जमाफीची नुसती घोषणा नको.... सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रात होतायत.... शेतक-यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी एक उत्तम आणि चांगल्या पद्धतीची कर्जमाफीची योजना राज्य सरकारने राबवावी..... किसान सभेचे डॉ.अजीत नवले यांची मागणी....