ABP Ideas Of India:स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ,तर काहीही शक्य : कैलास सत्यार्थी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांचे विचार शेअर करणार आहेत.
या सत्राची सुरुवात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांच्या संवादाने झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एबीपी न्यूजच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022’मध्ये सहभाग घेतला. त्यांनी 'द ह्युमनिटी इंडेक्स' या विषयावर चर्चा केली. कैलाश सत्यार्थी म्हणाले की, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही आम्ही करू.