Bharat Jodo Yatra :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला ३ दिवसांचा ब्रेक,२४ ते २६ ऑक्टोबरला यात्रा स्थगित

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आलीय. दिवाळीमुळे  २४ ते २६ ऑक्टोबर दरम्यान यात्रा थांबवण्यात आलीय.  २७ ऑक्टोबरला सकाळी पुन्हा तेलंगणातून यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिलीय. काँँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरु झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola