Hingoli Water Issue : हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, नागरिकांकडून टँकरची मागणी

Continues below advertisement

हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अनेक गावांमध्ये टँकरची मागणी असून सुद्धा जलजीवन योजनेचे काम आणि पाहणीचे कारण पुढे देत त्या गावांना अद्यापही टँकर मधून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नाही, असा आरोप नागिरकांनी केलाय. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 41 गावांसाठी 50 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. तरीहीपाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये अद्यापही पाण्यासाठी नागरिकांना  भर उन्हामध्ये पायपीट करावी लागत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola