Gondia Dam : भर उन्हाळ्यात धापेवाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ :ABP Majha

कडक उन्हाळा म्हणजे ऐन पाणी टंचाईच्या काळात एखाद्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केल्याचं तुम्ही ऐकलंत का? मात्र ही आश्चर्यकारक घटना घडलीय गोंदियातील धापेवाडा प्रकल्पात... या प्रकल्पातून चक्क पाण्याचा विसर्ग केला जातोय... हे सर्व झालंय अवकाळीमुळे... पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे धापेवाडा प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालीय... धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या आणि पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलाय... या या धरणाला २३ दरवाजे असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी एका गेटमधून विसर्ग केला जात आहे...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola