Farmers Marriage Story | कोरोनाच्या काळात शेतकरी पोरालाच मुलींची पसंती! वावर हाय तर पावर हाय!
पूर्वी वधूपिता आणि नातेवाईक मुलींसाठी नोकरीवाले, खाजगी कपंनी, व्यावसायिक याकडे नाते जोडण्याकडे कल होता मात्र कोरोना आला आणि परिस्थिती बदलली, मुबंई, पुणे, नागपूर, मेट्रो शहरात राहणारे तरुण गेल्या सात महिन्यापासून गावात आले व हातचे काम देखील गेले त्यामुळे आता मुलीचे वडील आता पुन्हा एकदा शेतकरी मुलगा मुलाच्या शोधात आहेत. कोरोना आला आणि शेतकऱ्यांच्या मुलाला चांगली स्थळे येऊ लागली आहेत. म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे. कारण कोरोनामध्ये अनेकांनी नोकऱ्या गमावल्याने आता शेतकऱ्यांचा विश्वास हा फक्त शेतकऱ्यांवरच राहिला असल्याचे दिसून येत आहे.