'राज्यपालांबद्दल शेतकरी नेत्यांनी खालच्या शब्दात केलेली टीका आक्षेपार्ह' - गिरीश महाजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Maharashtra Mumbai Farmers Protest) समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले होते. त्यानंतर राजभवनाकडे जाताना मोर्चा रोखण्यात आला. तसेच राज्यपाल उपस्थित नसल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली. यानंतर संयुक्त मोर्चाने राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.