राज्यपालांचा कार्यक्रम पूर्वनियोजित, शेतकऱ्यांना पत्राद्वारे दिली होती माहिती,राजभवनाकडून स्पष्टीकरण

मुंबई : दिल्लीला सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Maharashtra Mumbai Farmers Protest) समर्थन देण्यासाठी हजारोच्या संख्येने महाराष्ट्रमधील शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाले होते. त्यानंतर राजभवनाकडे जाताना मोर्चा रोखण्यात आला. तसेच राज्यपाल उपस्थित नसल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली. यानंतर संयुक्त मोर्चाने राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा आरोप करत संयुक्त मोर्चाच्या वतीनं राजभवनावर जाण्याचा निर्णय रद्द करत राज्यपालांना देण्यात येणारं निवेदन फाडून टाकण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola