खरबूज पिकवून कोट्यवधी कमावले, 70 दिवसात पाच कोटींची कमाई, यशस्वी शेतीचा 'खान्देश फॉर्म्युला'

कृषी विभाग,बियाणे कंपन्या,आणि निर्यातदार यांनी हातात हात घालून काम केले तर त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याच प्रात्यक्षिकच जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोधवत गावात आपल्याला पाहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत गावातील शंभर शेतकऱ्यांनी दोनशे एकर जमिनीवर एकाच जातीच्या खरबुजाची सामूहिक शेती करून,केवळ सत्तर दिवसात पाच कोटी रुपयांची कमाई करून ,शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola