Devendra Fadnavis | कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, सरकारबद्दल जनतेत असंतोष : देवेंद्र फडणवीस
मुंबई : भाजपचे आंदोलन महाराष्ट्र बचाओ आंदोलन आहे. हे सत्तेवरच सरकार घालवण्याचे आंदोलन नाही. देशातील 30 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत तर 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात आहेत. ही राज्य सरकारची निष्क्रियता आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस म्हणाले की, सरकारमधील मंत्री आभासी जगात जगतात. सोशल मीडियावर गँग बनवून आणि काही लोकांना आपले प्रवक्ते बनवतात, असंही फडणवीस म्हणाले. आज भाजपनं 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत निषेध आंदोलन केलं. यावेळी ते बोलत होते.