शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन सीमेवरील सैन्य माघारी परतणार - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली : भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली आहे. तसेच द्विपक्षीय चर्चेत भारतानं काहीच गमावलेलं नाही, असे देखील सिंह म्हणाले.
Tags :
China Attack India Vs China Defense Minister Indian Soldier Rajnath Singh India China India China War India China Border