Thackeray on Konkan | मच्छिमारांचे प्रश्न सरकार सोडवणार, कोकणासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन
कोकण किनारपट्टीवर जर प्रकल्प आणायचे असतील तर जे वैभव आहे ते टिकवलं पाहिजे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाणारचं नाव न घेता भूमिका व्यक्त केली. याशिवाय चिपी विमानतळ आणि पाणबुडी पर्यटनावर देखील मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. कोकणच्या विकासासंदर्भात आमदारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.