Chandrapur Corona | चंद्रपुरानं कोरोनाला हरवलं,कोरोनामुळे चंद्रपुरात एकही मृत्यू नाही | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांपैकी एक अशी ओळख असलेला चंद्रपूर जिल्हा एका बाबतीत अतिशय सरस ठरलाय आणि ही बाब आहे कोरोनाशी मुकाबला करण्याची. राज्यातील अनेक जिल्हे-शहरं जिथे कोरोनाशी मुकाबला करताना पस्त झाली, मात्र चंद्रपूर जिल्ह्याने अतिशय प्रभावीपणे या विषाणूला अटकाव घालण्यात यश मिळवलंय. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 198 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आतापर्यंत 100 जणांनी या आजाराचा यशस्वी पणे मुकाबला करून आपलं घर गाठलंय. तर 98 लोक सध्या उपचार घेत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.