BJP Leaders on #Carshed | कारशेडवरच्या निर्णयावरून पुन्हा भाजप नेत्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई : कांजूर कारशेडच्या मुद्द्यावरुन सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी कांजूर कारशेडबाबतच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे. याला ट्विटच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.