Uddhav Thackeray Aurangabad Visit : नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा ऋषिकेश चव्हाणची ठाकरेंनी घेतली भेट
पाऊस आला आणि बळीराजाच्या शिवाराची नासाडी करुन गेला. आता सुरु झालाय घोषणांचा पाऊस. सरकारने मदतीची घोषणा करताच विरोधकही शेताच्या बांधावर पोहोचले. उद्धव ठाकरेंनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निषाणा साधला. तर सत्ताधाऱ्यांनीही ठाकरेंच्या दौऱ्यावर तोंडसुख घेतलं. एकुणच काय तर शेताच्या बांधावरुन आता राजकारण पेटलंय. पाहूया सत्ता गेल्यानंतरचा ठाकरेंचा हा पहिला दौरा.