सरकारी सुविधा हव्यात तर लसीचा डोस अनिवार्य, औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवण्याचा ठाकरे सरकारचा विचार
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
12 Nov 2021 08:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारी सेवा हव्या असतील तर त्यासाठी लसीकरण अनिवार्य करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. औरंगाबादमध्ये इंधन आणि रेशन मिळवायचं असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आलंय. हाच औरंगाबाद पॅटर्न आता राज्यभरात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.