औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा हा मेळावा होता, आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप करत या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ केला. यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा, शिवस्मारक पूर्ण करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.