माझाच्या बातमीनंतर 'बामू' विद्यापीठ प्रशासनाला जाग, एकाच विषयात नापास झालेले 700 विद्यार्थी पास

ABP Majha Impact : औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं बी.कॉमच्या पहिल्या वर्षातील मुलांच्या निकालाचा खेळखंडोबा केला होता. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन विषयात जवळपास 700 विद्यार्थ्यांना सुरुवातीला नापास करण्यात आलं. पुन्हा एकदा पास करण्यात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा नापास करण्यात आलं. एबीपी माझानं विद्यार्थ्यांच्या या समस्येला बातमीच्या स्वरुपात सर्वात आधी वाचा फोडली होती. अखेर विद्यापीठ प्रशासनाला आता जाग आली आहे. बी. कॉमच्या पहिल्या वर्षातील 700 विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola