ओमराजेंना अटक करुन अन्वय नाईक कुटुंबियांसारखा आम्हाला न्याय द्या; मृत शेतकरी ढवळे कुटुबीयांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
उस्मानाबाद : अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांना जसा न्याय दिला तसा आम्हाली न्याय द्या, अशी मागणी उस्मानाबाद जिल्ह्यातले मृत शेतकरी दिलीप ढवळे यांच्या कुंटुबियांची आहे. दिलीप ढवळेंसह 16 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून परतफेड न केल्याचामुळे दिलीप ढवळे यांनी 12 एप्रील 2019 या दिवशी पहाटे पाच वाजता आत्महत्या केली होती. आत्महत्येआधी दिलीप यांनी सेनेचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.