अनेक प्रश्न समोर असताना कार्यक्रम घाईघाईत करण्याची गरज काय?- आनंदराज आंबेडकर

पायाभरणीच्या आमंत्रणाबाबत आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "मला निमंत्रण आलं नव्हतं. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया वातावरण तयार झालं. त्यानंतर एमएमआरडीएने पत्र पाठवून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं. एमएमआरडीएच्या कामावर प्रश्न उपस्थित केल्याने ते आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. संपूर्ण कामाच्या दर्जासाठी एक समिती बनवावी, अशी माझी विनंती आहे. स्मारक तयार झाल्यावर लाखो लोक येणार आहेत. समुद्राच्या जवळ असल्यामुळे दर्जा न राखल्यास अपघात झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असणार आहे.


तर हा कार्यक्रम एवढ्या घाईने उरकरण्याची गरज काय होती, असा प्रश्नही आनंदराज आंबेडकर यांनी विचारला आहे. "राज्यात आधीच कोरोना, मराठा आरक्षण यांसारखे प्रश्न असताना हा कार्यक्रम एवढ्या घाईघाईने उरकण्याची गरज काय होती. महाराष्ट्रातील वातावरण आधीच तापलेलं आहे अशा वेळी हा कार्यक्रमासाठी घाई करण्याची गरज नव्हती, असं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola